0 एमबीएच्या सीईटीसाठी १५ जानेवारीपासून अर्जस्विकृती, तर १५ फेब्रुवारीला सीईटी0

रविवार, ४ जानेवारी, २००९

अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षासाठी आता अधिक प्रवेश फे-या

अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे रिक्त होणा-या दुस-या वर्षातील जागांवरील प्रवेश आता केंद्रीभूत पद्धतीने करण्याचा तत्वतः निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. केंद्रीभूत पद्धतीने दोन फे-या तर समुपदेशन पद्धतीने एक फेरी घेऊन हे प्रवेश केले जातील. या निर्णयामुळे अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे दुस-या वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जवळपास पाच हजार जागा रिक्त राहायच्या. पण बहुतांशी महाविद्यालये या जागा संस्थास्तरावर भरायचे. या प्रक्रियेमध्ये संस्थाचालक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना साधा अर्जही सादर करण्याची संधी न देता कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना देणगी आकारून प्रवेश देत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारने सदर निर्णय घेतला आहे.
वस्तुतः पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुस-या वर्षात प्रवेश घेता यावा या करिता १० टक्के जागांची वाढ केली जाते. या वाढीव जागा केंद्रीभूत पद्धतीने भरण्यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने गेल्या शैक्षणिक वर्षापर्यंत प्रवेशाची केवळ एकच फेरी घेण्यात येत होती. शिवाय पहिल्या वर्षात नापास झाल्याने रिक्त होणा-या जागांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश केला जात नव्हता. काही ग्रामीण भागातील महाविद्यालये मात्र आपल्या रिक्त जागा भरण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे. पण बहुतांशी महाविद्यालये या रिक्त जागा संस्थास्तरावर भरत होते. या प्रक्रियेत संस्थाचालक देणगी देणा-या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यायचे. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहायचे. या प्रकाराचा फटका अनेक गुणवान विद्यार्थ्यांना बसत होता. विशेषतः गेल्या शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून डावलण्यात आले होते. या बाबतच दैनिक लोकसत्ताने अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. डिसेंबर २००८ मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशातही या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षाच्या प्रवेशासाठी अधिक फे-या घेण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल.

तक्रार व समस्या

प्रवेश प्रक्रियेमध्ये अन्याय झाला, संस्थाचालकांनी नियमबाह्य शुल्क आकारले, गुणवान विद्यार्थ्यांना डावलण्यात आले...चिंता करू नका. तुमची तक्रार educationpatra@gmail.com या ई-मेल वर कळवा, आम्ही त्यावर तात्काळ उपाय सूचवू. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. शिक्षणातील फसवेगिरीला या व्यासपीठाच्या माध्यमातून नक्कीच आळा घालता येईल. गरज आहे ती केवळ तुमच्या मदतीची.

About This Blog

About This Blog

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP